Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: May 2006

Monday, May 29, 2006

आरक्षण...खायचे व दाखवायचे दात.

सर्व प्रथम कॉंग्रेस व अर्जुनसिंगाचे अभिनंदन!!!
मताच्या राजकारणाच्या डावपेचात तुम्हीं जिंकलात. आता पुढच्या १००-१५० वर्षे कशाची पर्वा करण्याची गरज नाही. डोळे झाकून तुम्ही सत्तेवर याल व रहाल.
त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे म्हणजे नक्की काय हो?
परवाच `पिछडा वर्ग आयोग'National Commision for Backward Class च्या एक महिला सदस्याची मुलाखत पाहिली. पाहिल्यानंतर माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. गेली कित्येक वर्षे म्हणे ह्या आयोगाची अधक्ष्यांची जागा रिक्त आहे. बहुतेक आरक्षीत लायक व्यक्ती तयार होण्याची वाट बहुतेक सरकार पहात आहे.
ह्या आयोगाचे मुख्य काम म्हणजे आरक्षणाबाबत अहवाल तयार करणे. कोणत्या कोणत्या आरक्षीत जातींना त्याचा फायदा झाला. आरक्षणामुळे किती मागास जातीतील उमेदवार उच्च पदापर्यंत पोहोंचले वगेरे, वगेरे.
आता पहा गेली १३ वर्षे म्हणे त्यांच्याकडे कसलीही नोंद नाही. किती जातींना, उमेदवारांना ह्याचा फायदा झाला. कोणत्या जाती वगळायच्या, कोणत्या नविन जाती ह्याचा काहीही ताळेबंद नाही. तरीही सरकार कोणताच विरोध न जुमानता फक्त एक गठ्ठा मतावर डोळा ठेवून आंधळे निर्णय घेते आहे.
खुप झाले, खरचं खुप झाले, मुख्य प्रवाहात आणायचे. ते नाही येवु शकले तर मुख्य प्रवाह का ते म्हणतात तोच त्यांच्या कडे वळवायचा. कशी वाटली कल्पना!!!
सरते शेवटी राजकारण्यांनी सगळीकडेच आरक्षण करावे असे मला तरी वाटते. म्हणजे खुल्या जातीच्या लोकांना चांगली अद्दल घडेल. भलते उड्या मारत होते की बुद्धीवत्तेनेच मोठे होता येत होते.
आता खुल्या वर्गा समोर काय उपाय तर बॅग भरयाची आणी पोट भरण्या साठी परदेशी निघायचे. बरे उपकार आपल्या मायबाप सरकारचे, अजुन त्यांना हे नाही सुचले की २७% हे लोक बाहेर देशी गेल्यावरच खुल्या वर्गातील जावू शकतील.
धन्य ती धर्मनिरेपेक्ष लोकशाही, जातीविरहीत शासन संस्था, ह्या सगळ्याचा असा अर्थ आमच्या सारख्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला.
नशिब इथे लिहीण्यासाठी अजुनतरी जातीची अट नाही.

Wednesday, May 17, 2006

साम्य.

महात्मा गांधी व मल्लिका शेरावत यांच्यात साम्य काय?
दोघांनीही बिल्कुल कमी कपडे अंगावर ठेवले.
एकाने देशासाठी तर दुसरीने देशवासींया साठी..

साम्य.

महात्मा गांधी व मल्लिका शेरावत यांच्यात साम्य काय?
दोघांनीही बिल्कुल कमी कपडे अंगावर ठेवले.
एकाने देशासाठी तर दुसरीने देशवासींया साठी..

How to make babies?

A second grader came home from school and said to her mother, "Mom, guess what? We learned how to make babies today."

The mother, more than a little surprised, tried to keep her cool. "That's interesting," she said. "How do you make babies?"

"It's simple," replied the girl. "You just change "y" to "i" and add "es".

Tuesday, May 16, 2006

चोरावर मोर.....(विनोद)

पत्नी(पतीला): समजा तुम्ही ऑफिस वरुन आलात व मी तुमच्या सगळ्यात आवडत्या, जवळच्या, तुम्हांला प्राणापेक्षा प्रिय अशा व्यक्तिच्या मिठीत आहे हे पाहिल्या नंतर तुमची पहिली प्रतीक्रिया काय असेल?
पती: हेच की तु लेस्बियन आहेस.

Saturday, May 13, 2006

तनसे तन का मिलन.......

मागच्या आठवड्यात एक बातमी "आज तक" वर पाहीली. एका मुस्लीम युवतीने आपला प्रियकर दुसऱ्या बाईशी लग्न करतोय म्हणून गोळ्या झाडून त्याला यमसदनी पाठवले.
आणी कालच आणखी एक पाहीले. हरदोई इथे प्रियकर स्वताच प्रेयसीच्या विवाहात मानवी बॉंबच्या रुपात स्फोट घडवून हाहाकार माजवला.
मन अगदी सुन्न झाले ते बघून. म्हणे प्रेमासाठी हे केले. हे करण्यामागे कसली आली प्रेम भावना. प्रेम एवढे क्रुर बनवते? नसेल येवु शकले ते एकत्र, काही मर्यादा मुळे, सामाजिक बंधनामुळे म्हणा. आपला प्रियकर / आपली प्रेयसी कायमचे आपले नाही झाले तर आपण जिव लावला त्याचाच जिव घ्यायचा? का त्यांचे प्रेम एवढा सुध्दा त्याग करणे नाही शिकवू शकले?
आजकाल प्रेम म्हणजे एक फॅड झाले आहे.
सोमवारी प्रेम बसते न बसते तो शनिवार पर्यंत ह्यांचा प्रेमभंग ही झालेला असतो. मग सुरु होते सुडाची कहाणी. एक तर देवदास बनुन कोणत्याना कोणत्या व्यसनाच्या आहारी जाणे किंवा मग स्वताच्या नाहीतर दुसऱ्याच्या जिवावर उठणे??
बाबांनो प्रेम एवढे सोपी किंवा थिल्लर गोष्ट नव्हे नाही हो. जर असे असले असते तर जनावरात व माणसांत काहीच फरक नाही का? सगळ्यांनाच प्रेमात नाही यश येत, मग प्रेमाची व्याख्याच बदलते की काय? जिवन म्हणजे चित्रपट नव्हे? सगळेच थोड्याच वेळात निर्माण व्हायला व संपायला देखील.
तुमचे आणी आमचे सेम नसले तरी शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असते ना??
यावेळी आठवतात त्या पुढील ओळी..
तन से तन का मिलन होना पाया तो क्या?
मन से मन का मिलन कोई कम तो नही..
चांद मिलता नही सबको संसार में
एक दिया ही बहोत है रोशनीके लिये
मग जितक्या वेळ एकमेकांच्या सोबतीत उपभोगलेल्या सोनेरी क्षणांच्या आठवणींच्या रोशनीत उरलेले आयुष्य काढणे शक्यच नाही का? का करायलाच पाहीजे प्रेमाला बदनाम? का करावीशी वाटते मग स्वतासोबतच दुसऱ्यांच्याही आयुष्याची बरबादी?? ह्यामुळे कांही साध्य होत असए नाहीच पण प्रेम मात्र कलंकित होते.

Tuesday, May 09, 2006

तुला विसरायचय...

काल पक्कं ठरवल होत
तुला विसरायचय..
अगदी आठवणीन, न विसरता
तुला विसरता विसरता
विसरुनच गेलो कि
तुला विसरायचय..
अन विसरुन गेलो
स्वताचच अस्तित्व
तुला विसरतानाच्या
तुझ्याच आठवणीनं

Saturday, May 06, 2006

म्हणींची सर मिसळ...

एक विद्यार्थी ४ च्या परिक्षेची तयारी न करताच पेपरला आला. आपल्या असामान्य सामान्यज्ञानाच्या जोरावर त्याने अर्धवट म्हणीं कशा पुर्ण केल्या, त्या पहा....


सुरवातीला योग्य म्हण व त्याखाली त्याने पुर्ण केलेली म्हण.


नाचता येइना आंगण वाकडे.
नाचता येइना.....कुत्रा आवर.

नांव सोनुबाई अन हाती कथळाचा वाळा.
नांव सोनुबाई अन......वडापाव शिवाय खात नाही.

देव देते अन कर्म नेते.
देव देते...हाती कथळाचा वाळा.

भटाला दिली ओसरी, भट हळू हळू पाय पसरी.
भटाला दिली ओसरी,.....तर जमतील भुते.

आपला हात जगन्नाथ
आपला हात.....गुळाची चव काय?

कुठेही जा, पळसाला पाने तिनच.
कुठेही जा,....देईना कुणी मुका.

घरोघरी मातीच्याच चुली.
घरोघरी..भट हळू हळू पाय पसरी.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडला हरी.....भट हळू हळू पाय पसरी.

ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागला.

ढवळ्या शेजारी पवळा बांधला....तर डर कशाला?

साडी नेली बाईंन अन चिंधी नेली गायीनं.
साडी नेली बाईंन...अन चांभार पोरं मारी.

बोले तैसा चाले....त्याचे आंगण वाकडे.

असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
असेल हरी तर.....पण कुत्रा आवर

कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात.
कावळ्याच्या शापाने.... चार दिवस सुनेचे.

बैल गेला अन झोपाळा केला.
बैल गेला अन...गायी मरत नसतात

हत्ती गेला अन शेपुट राहिलं.
हत्ती गेला....त्याला कोण रडे?

ऊस गोड लागला म्हणून मुळांपासुन खावू नये.
ऊस गोड लागला म्हणून....झोपाळा केला.

करुन करुन दमला अन देव पुजेला लागला.
करुन करुन दमला....त्याची वंदावी पाऊले.

मनी वसे ते स्वप्नी दिसे.
मनी वसे ते...कर्म नेते.

आयजीच्या जिवावर बायजी उदार.
आयजीच्या जिवावर बायजी.....गाढवाचे पाय धरी.

हलवायाच्या घरावर तुळशीपत्रं.
हलवायाच्या घरावर.....भाराभर चिंध्या.

म्हतारी मेल्याच दुख: नाही पण काळ सोकवतोय.
म्हतारी मेल्याच दुख: नाही....घाल कुत्र्याला.

जावयाच पोरं हरामखोर.
जावयाच पोरं.....केरात.

सासरच्या जिवावर जावाई सुभेदार.
सासरच्या जिवावर.....गाढव चाललं भुकत.

दुष्काळात तेरावा महिना.
दुष्काळात....वैद्य मरो.

आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
आडातच....जगन्नाथ.

आत्याबाईला मिशा आसत्या तर काका नसते का म्हट्ले?
आत्याबाईला मिशा आसत्या तर....पोहऱ्यात कोठून येणार?

चोराच्या हाती द्याव पन पोराच्या हाती नाही.
चोराच्या हाती....आरसा कशाला?

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
नकटीच्या लग्नाला.....व्याह्यांन धाडलं घोड.

स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही.
स्वत: मेल्या शिवाय...भांडे कशाला लपवायचे?

Wednesday, May 03, 2006

श्रध्दांजली......



"निघालास"
"हो, आजचे काम झाले तर आयुष्यातली मोठी भरारी असेल"
"काळजी घे बाबा, सोबत कुणाला घेतलेस का"
"हां, माझा छोटा भाऊ आहे, त्यामुळे कांही चिंता नाही"
"छोटा भाऊ आहे म्हणतोस, मग तर संभाळ रे बाबा"
********************************
अजात शत्रु, एक उमदे व्यक्तिमत्व, धडाडीचा राजकारणी, `चाणक्य' व `रामाचा लक्ष्मण' ही,
प्रमोद महाजनांच्या आत्म्याला शांती लाभो. हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
आम्ही पामर एवढेच करु शकतो...
Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>